Monday 18 April 2011

उन्हाळा मनातला, वळीव जनातला


उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं की, 
उन्हाळय़ाबद्दल, त्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही ...
पावसाबद्दल, सुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!

‘‘आज अचानक पुण्याची दरारून आठवण येतेय. सध्या उन्हाळा सुरु झाला असेल..सगळी लोक या वर्षीचा उन्हाळा किती जास्त आहे मागच्या उन्हाळ्या पेक्षा हेडिस्कस करत असणार.’’ हे वाक्यअर्थातच मूळ पुण्याच्या आणि आता तिथं नसलेल्या व्यक्तीचं.. ही प्राची.. खाऊघर’ नावाचा ब्लॉग लिहिणारीपेशानं एव्हिऑनिक्स इंजिनीअर आणि ब्रिटनमधल्या ब्रिस्टलला राहणारी. तिच्या याच ब्लॉग-नोंदीत शेवटी-शेवटी एक वाक्य आहे, ‘‘इंग्लंड मध्ये राहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जिचं महत्व पटतंती म्हणजे उन - सध्या इकडेही हळूहळू उन्हाळा सुरू होतोय. उन्ह पहिलं की कोण आनंद होतो.. आणि इकडे पावसाचा मस्त आवाज येत नाही..’’
 
प्राचीची ही नोंद खाऊघरमधल्या बाकीच्या- प्रामुख्यानं रेसिपींपेक्षा निराळी आहे. तशी वेगळी नोंद करण्याचं कारण, ‘दरारूनकिंवा उन्हाळ्यात येणा-या घामासारखी दरदरून आलेली आठवण! उन्हाळा इथं नाही आणि तिथं असणारही जाणीव..
 
पण समजा तुम्ही इथंच आहाततर असेल का तुम्हाला उन्हाळ्याचं कौतुक?
 
‘‘माझ्याकडे मिरच्या सुकवायला जागा आहे आणि वाशीचे एपिएम्सी मार्केट घराजवळ आहे त्यामुळे दरवर्षी मसाला माझ्याकडेच बनवला जातो. ज्याने त्याने जेवढा हवा तेवढा आधीच सांगायचा. मग एके शुक्रवारी संध्याकाळची आई अवतरते माझ्या घरी. बोरिवली ते बेलापूर येणे हे तिच्यासाठी जगाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाण्यासारखे आहे. मग रात्री उशिरापर्यंत उद्या काय काय घ्यायचे त्याची यादी बनते. शनिवारी सक्काळीच उठून आमची वरात एपिएम्सीच्या मार्केटात.
 
दोनेक तास लागून सगळी खरेदी.. मग दुपारी घरी आल्यावर आईची अगदी घाई उडते. लगोलग मिरच्या वाळत टाकणार.
 
अगंकर आरामात. कशाला घाई करतेस?’
 
आता मसाला होईपर्यंत मी काही आराम करत नाही बघ. आणि जरा उन दाखवले की मिरच्यांचा कुटाणा पडत नाही गं.
 
हे सगळं उन्हाळ्यातच होतंयउन्हाळय़ातच लिहिलं जातंय..
  
इथंया नोंदीत आठवण कसली आहे?
 
उन्हाळ्याची नाहीमसाल्याचीही नाही.. आईची आठवण!
 
श्रावणातच जणू माहेरची आठवण होतेअसा प्रघात स्त्रीगीतांनी पाडून ठेवलेला आहेत्यापेक्षा हे ब्लॉगवरलं किती वेगळं आहेइथं आईच्या आठवणीचा ब्लॉग तिच्याशी फोनवरल्या गप्पांपासूनच सुरू होतो आणि मालवणी मसाल्याच्या रेसिपीपाशी संपतो!
 
उन्हाळ्याचं नातं गृहिणीपणाशी नक्की आहेअसं या ब्लॉग-नोंदीवरून जाणवू लागतं.. पन्हंमसालेपापड- कुरडयायांच्या आठवणी उन्हाळय़ाबद्दलच्या अनेक ब्लॉग-नोंदींनी काढल्या आहेत. पण उन्हाळ्याबद्दल दरारून’ किंवा भरभरून बोलणा-या नोंदी जरा कमीच आहेत. या उपलब्ध नोंदींचा सूर आठवणवजाच आहे! उन्हाळय़ात पाहुणे यायचेकौटुंबिक बोलणं व्हायचं,तेव्हाचं एकेकाचं बोलणंसुद्धा या ब्लॉग-नोंदींसारखंच असेलअसंही वाटू लागतं!
 
प्राची यांच्यासारखी दुसरी दूरदेशीची माहेरवाशीण कांचन. त्यांनी मिशिगनच्या उन्हाळ्याबद्दल लिहिताना एवढास्सा इथला उन्हाळा लोक कसा साजरा करतातजागोजागी समर मार्केट’ भरतातयाचा उल्लेख केला आहे आणि एवढे लोक बघूनच बरं वाटतं’ असा सूरही लावलाय. भारतात नसलेले एक भारद्वाज’ म्हणून आहेतत्यांनी काही धनिक अमेरिकनांची समर हाउसेस’ असतातअशी नोंद केली आहे. पण उन्हाळा हा या नोंदींचा मुख्य विषय नाही!
 
एक अपवाद आहे.. पुण्याची एक तरुण आणि नवीनच ब्लॉगर आहे सायली चौधरी. सहज कधीतरी’ हे तिच्या ब्लॉगचं नाव योग्यच वाटेलअसं ती लिहिते. शब्दयोजना चपखलपण वाक्यरचना मात्र अनघड ओबडधोबडही! अभ्यासू मुलींमध्ये दिसणारं समंजसपणा आणि अल्लडपणाचं मिश्रण  तिच्या लिखाणात आहे. ती लिहिताना कुठलीही पोज न घेणारी ब्लॉगर आहे. प्रसंगी ती स्वत:वरही विनोद करू शकतेम्हणूनच बहुधा ती कवितापंथाला न लागता गद्यलिखाण करू लागली! अनाग्रही गद्यातला संज्ञाप्रवाह ती छान सांभाळते..
 
कितीतरी गोष्टी .. उन्हाळ्याच्या..!!’ या शीर्षकाच्या नोंदीत तिनं लिहिलंय.. ‘‘पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा.!’’, ‘‘डोक्यावर स्कार्फनखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणा-या मुली. सनकोटग्लोव्हजची खरेदी करणा-या असंख्य बायका..’’ पण सायलीलाही आवडतो तो पावसाळाच.. पुण्याला गेल्याच आठवडय़ात वळवाचा पाऊस झालातेव्हा सायलीनं नजरेला भावते ते सर्व काही..’ अशा नोंदीत हे लिहिलं :
 
‘‘पहिल्या पावसानंतर सांज खुलते अगदी तसेच रंग काल आकाशाने धरले होते. आज ऑफिसमधे असताना सरी यायला सुरुवात झाली. आंब्यांसाठी हळहळ पण तरीही थंडाव्याने आम्ही सुखावलो होतो. साडेसहाला सुटले तशी गाडी जोरात हाकत घरी आले आणि तडक गच्चीत गेले. पुण्यात सहकारनगरला जरा डोंगरावरच घर असल्याने गच्चीतून जवळजवळ निम्मं पुणं दिसतं. पाऊस सुरू झाला तसं टप्प्याटप्प्याने भिजणा-या पुण्याला बघताना मनोमन मी पण भिजत होते. अशा वेळी लाईट गेले तर ढगांचे गुलाबी केशरी रंग आणि मधेच कडाडणा-या विजेच्या लखलखाटात कितपत दूर शहर दिसतंय हे बघायचा पोरकट प्रयत्न होतो.’’
 
वळीव ही चीजच अशी आहे की, ‘मी तो अनुभवला’ हे सांगण्याचा मोह कुणालाही होतोच. चिंचवडच्या सागर बोरकरनं यंदाच्या वळवात सिक्सरच मारलाय- सहा-सात प्रकारचे फोटोच टाकलेत सरळ ब्लॉगवर. ‘‘नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही’’ असं सागर लिहितो.  
 
वळवानंतर जो मृद्गंध येतोत्याबद्दलची एक खूप खरी कॉमेंट ब्लॉग-जगतातच सापडली होती एकदा. मूळ नोंद बहुतेक,आवडते वास अशी काहीतरी होती. तर कुणा सागरनं (हा सागर बोरकर नसेल) कॉमेंटमध्ये लिहिलंय :
 
‘‘कालचीच गोष्ट.. वळीव पडला..
 
मला आजकाल वाटायचं मृद्गंध’ हा शब्द खूप क्लीशे झालाय.. सगळेच वापरतात कुठेहीकसाही.. पण काल आला तो. मातीचा मंद वास.. क्लीशे ब्लीशे गेले उडत.. मातीचा वास तो मातीचा वासच !!’’
 
हा सागर ब्लॉगर आहे की नाहीमाहीत नाही. पण त्याची भाषात्यामागची तरुण तडफ मुद्दाम पुन्हा वाचून पाहा. हा सागर लिहीत असेलतर कधीतरी सापडेलच ब्लॉगजगतात.
 
उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं कीउन्हाळय़ाबद्दलत्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही. पावसाबद्दलसुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!
 लिखाणाचा खरा ऋतू पावसाळाच बहुधा. आनंद हीच महत्त्वाची अनुभूतीआणि सांगण्याजोग्या अनुभूतीखेरीज लिहायचं नाहीअशा धारणेमुळे पावसाळ्याबद्दलच लिखाण जास्त होत असावं. उन्हाळा आठवणीपुरता बरा.. पण अनुभव हवा पावसाचाच! 

Tuesday 12 April 2011




ब्लॉगर लोक किती फास्ट असू शकतातयाचा पुरावा दोन एप्रिलरोजी पुन्हा मिळाला. इकडे ढोणीनं षटकार मारताच तिकडेकाय वाट्टेल ते’ या महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर अक्षरं-जिंकलो’!!! लगेच दुस-या दिवशी सकाळपर्यंत त्यावर 12 प्रतिक्रियाही आल्या.‘‘अशा प्रसंगी प्रत्येक भारतीय, ‘मी’, ‘आम्ही’ या संज्ञा विसरूनआपण’ होतो.’’ अशी एक प्रतिक्रिया याच ब्लॉगवर उल्हास भिडे यांनी दिली होतीती खरीच असल्यासारखं वातावरण चार एप्रिलपर्यंत नक्कीच टिकलं होतं. रस्तोरस्ती जल्लोष- आनंद आणि तो बहर संपल्यावरही ज्याच्यात्याच्या मुखी विश्वचषक-विजयाबद्दलच्याच गप्पा! याच वातावरणात अनेकजण ब्लॉगिंगही करत होते.
  
आपापल्या परीनं विश्लेषणही काही हौशी मराठी ब्लॉगरांनी केलं. ‘‘यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचाजिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होतेयावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकताविजय खेचून आणण्याची वृत्तीलढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्त्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगलेनाही का? ’’ असं अभिजीत नावाच्या ब्लॉगरनं‘‘माझे लेखन-काही अरभाट नि काही चिल्लर!’’ या त्याच्या ब्लॉगवर लिहिलं आहे. पण पुढे अभिजीत निराळीच भूमिका घेतो : विजेत्या क्रिकेट संघात आपापल्या राज्यांतले जे खेळाडू होते,त्यांनाच बक्षिसं देण्याच्या राजकारण्यांच्या वृत्तीवर अभिजीत उखडला आहे. त्या भरात ‘‘शीला दीक्षित बाईही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काययाचीच री पुढे उत्तराखंडमहाराष्ट्रपंजाब नि गुजरात सरकारने आपापल्या’ खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली.’’ असे कोरडेही त्यानं ओढले आहेत. मुळात ही बक्षिसं द्यायची कशालाहा विचार इथे नाही. लिहिणारा त्या क्षणी क्रिकेटपटूंवर खूष आहे!
 
अशीच खुशी अन्य काही मराठी ब्लॉगरांना होती. अविनाश वीर यांनी अंतिम सामन्यातल्या विजयानंतर अख्ख्या विश्वचषकानं क्रिकेटप्रेमींचे भावनिक प्रतिसाद कसे जागते ठेवलेयाचा अथपासूनचा आलेख चितारणारा चित्रदर्शीच लेख मी पण लिहितोय’ या त्यांच्या ब्लॉगवर लिहिला आहे
हे वर्णन ठाणे-घोडबंदरच्या एका बारपासून सुरू होतं.. 
‘‘जिंकायचेच हे धोनी आणि संघाच्या देहबोलीतून जाणवू लागले. आणि बघता बघता धोनीने (तोपर्यंत फक्त जाहिरातीत दिसणारा) हेलीकॉप्टर’ हाणला आणि आपण जिंकलो. आईशप्पथ! सगळे आनंदाने उडय़ा मारू लागले. ओळख ना पाळख सगळेच एकमेकांना (पोरी सोडून) मिठय़ा मारू लागले. मी तर वजन वाढल्यावर एवढय़ा उडय़ा मारू शकतो हे विसरूनच गेले होतो.’’ पुढे, ‘‘जल्लोष करून आम्ही आलो तलावपाळीला. फुल राडा सुरू होता. आपण जिंकलो होतो. सचिनला रडताना पाहून तर फारच भावनिक झालो’’ असं अविनाश सहज बोलल्यासारख्या आणि वाचतानाही जणू उत्साही आवाजात ऐकूच येणा-या भाषेत लिहितो. ते वाचनीय नक्कीच आहे.
 
जनसामान्यांच्या आठवणीही इतिहासासाठी मोलाच्या आहेतअसं मौखिक इतिहास ही शाखा मानते. त्या आग्रहाशी तंतोतंत जुळणारा ऐवज मराठी (किंवा अन्यभाषक) ब्लॉगविश्वात आपसूक तयार होतो आहे. अविनाश वीर यांच्या लेखावर वैभव गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत पुढे एक उल्लेख आहे, ‘‘खरं सांगायचं तर दर सामन्याला मला वाटत होतं की आज काही खरं नाही आपलं. नशीब घरात देव नाहीत-नाहीतर रोजच्या बुडवण्याने पिसाळले असते माझ्यावर.’’ ही नास्तिक-अस्तिकाचा घोळ न घालणारी खिलाडूवृत्ती आज काही टक्के मराठी तरुणांच्यात भिनते आहेअसा बारकावच आहे हा. विश्वचषक जिंकल्यानंतरचा निर्व्याज आनंदउफाळून आलेलं देशप्रेमयाचा आलेख अन्य काही मराठी ब्लॉगांवरही आहे. त्यापैकी एका ब्लॉगरनं मी मॅच असली की ऑफिसलाच जातो आणि ऑफिसच्या कम्प्युटरवरूनएका मराठी वर्तमानपत्राची वेबसाइट पाहात-पाहात इतरांना स्कोअरची माहिती देतो’ हे सांगण्यात धन्यता मानली आहे. क्रिकइन्फो’ सारख्या अस्सल आणि वेगवान साइटचा उल्लेखही त्यानं केलेला नाहीपण तो क्रिकेटप्रेमीच! अशी काही नमुनेदाऽर उदाहरणंही आहेत इथे.. पण ती एकदोनच. शिवाय, ‘मौखिक इतिहासात अशा नमुन्यांनाही स्थान असतंच की.
 
विश्वचषक जिंकल्यावर जे काही होतं तो युफोरिया- हर्षवायूसारखा परमानंद- असंच काही नाहीयाचंही भान ब्लॉगजगतातून उलगडणारा मौखिक इतिहास आपल्याला देतो. सांस्कृतिक पुणे’ या ब्लॉगवर मंगेश वाघमारेनं लिहिलेली एक पत्रवजा नोंद (हा ब्लॉग मंगेशचा नसूनही) प्रकाशित झाली आहे. मंगेश वाघमारे म्हणतात-
   
जरा याचाही विचार कराअसं मंगेशच्या नोंदीचं शीर्षकच आहे.. आपण निराळी भूमिका मांडतो आहोतयाची जाणीव लेखकालाही आहे. सुभाष इनामदार यांनी या नोंदीवर प्रतिक्रिया देऊन त्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं.  ‘‘सध्याच्या वातावरणात असे काही बोलणे म्हणजे जणू धर्मद्रोह किंवा देशद्रोहच. जनांचा लोंढा ज्या दिशेने चालला आहे त्याविरुद्ध जाण्याचे धाडस दुर्मिळच.’’ असं इनामदार म्हणतात. पण इनामदारांना म्हणायचंय कायहे बहुधा लक्षात न घेता, ‘धर्मद्रोह,देशद्रोह’ असे शब्द असलेली त्यांची कॉमेंट या ब्लॉगवरून सध्या गायब झालेली आहे.
 
आता तर इनामदारही म्हणू शकतात कीमी अशी कॉमेंट केलीच नव्हती. ब्लॉगांवरला इतिहास मौखिकच उरतो तो असा!
 
स्पृहा’ या नावानं कानगोष्टी’ हा ब्लॉग लिहिणारी एकजण क्रिकेटच्या अनुभवाचं आकलन करता-करता त्याच्या पलीकडे गेली आहे. अविश्वास हा आजच्या जगातला श्वासच कसा बनलायया महत्त्वाच्या मुद्याला तिची द ट्रमन शो’ या शीर्षकाची नोंद स्पर्श करते. हे सारं या नोंदीत क्रिकेटपासनं सुरू होतंत्यामुळे ते वाचणं महत्त्वाचं ठरेल : 
 
‘‘मला क्रिकेट अतिशय आवडतं.. अगदी मनापासून.. पण गेल्या काही वर्षापासून माझा या स्पर्धावरून मात्र विश्वासच उडत चाललाय.. इतर खूपशा छान गोष्टींवरून उडत चाललाय तसाच.. हा वर्ल्ड कपही लुटू पुटूचा वाटतो.. आपण जिंकल्यावर आनंदही होतोमग लगेच वाटतंहे जिंकणं खरंअसेलएखाद्या फिल्डरच्या हातातून कॅच सुटतोमनात प्रश्नचिन्ह.. कॅचसुटला’,की सोडला’?? .. खूप वाईट वाटतं. मग..स्वत:चाच राग येतो.. आपण आपला हा आवडता खेळ,’खेळ’ म्हणून पाहूच शकत नाही. या भावनेने कोंदून गेल्यासारखं होतं.. वर्ल्ड कप.. की एक इव्हेंट’ फक्त..कोट्यावधींचा. जाहिरातीचा.. प्रायोजकांचा.. बेटिंगचा.. पैसेवाल्यांचा.अर्थकारणाचा.. सत्ताकारणाचा..साध्या-भोळ्या माणसांच्या भावनांचा.. एक खेळ’ फक्त.!!!
 
.. हे खरं की खोटंयावर वाद घाला हवंतर.. पण त्याऐवजी जरा संवाद करण्याच्या मूडमध्ये असालतर स्पृहासारखा स्वत:च्या आनंदावरलाही विश्वास उडावा असा प्रसंग कधी तुमच्यावरही आलाय कायाचा खरंच विचार करा.

Tuesday 5 April 2011

गुढीपाडव्याच्या बाजूने आणि विरुद्ध!



आज पाडव्याच्या दिवशी ब्लॉग सुरू केला’ अशी दोन वर्षापूर्वीची नोंदत्यानंतर आठवडय़ाभराने ब्लॉगवर एखादी कविता किंवा फॉरवर्ड-ईमेलवरून चिकटवलेला मजकूर आणि मग काहीच नाही. असेही नाममात्र ब्लॉगर आहेत. ब्लॉगची गुढी उभारून झालीएवढय़ा एका समाधानाखेरीज त्यांना काहीच मिळालं नसेल त्यांच्या ब्लॉगमधून. पण बाकीचे किमान तीन-चारशे रेग्युलर ब्लॉगर (हौशी मराठी लेखक) आहेतही आपल्या समाधानाची गोष्ट. काही नाही तरी, ‘गुढीपाडव्याच्या शुभेच्छायेत्या सोमवारीही अनेक मराठी ब्लॉगांवर पाहायला मिळतील. म्हणजे चैत्र-पाडव्याला गूळकडुनिंब खाणेगुढी उभारणे या उपचारांत पाचेक वर्षापूर्वी जशी शोभायात्रांची भर पडलीतशी आता ब्लॉग-नोंदींचीही भर पडते आहे.
 
गुढीपाडव्याला केलेल्या वा या सणाबद्दलच्या ब्लॉग-नोंदींमधून लेखकांचं काही चिंतन दिसतं काशुभेच्छांच्या पलीकडे या सणाबद्दल काही बोलता येतं कायादृष्टीनं शोध घेतला तर मात्र अगदी मोजके ब्लॉग हाती येतात. वयानं पन्नाशीपार गेलेल्या दोघा ज्येष्ठांनी आपापल्या ब्लॉगवर निरनिराळ्या वेळी केलेल्या नोंदी चिंतन’ म्हणावंअशा आहेत. काळाला स्वीकारण्याची हतबलता आणि तयारी या दोन टोकांच्या मधला जो टापू असतोतिथं कुठंतरी राधिका रेडकर (http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_19.html)  आहेत.  त्यांनी आपल्या लहानपणीच्या पाडव्याचं वर्णन करूनअखेरच्या परिच्छेदात लिहिलंय-
 
आज तो’ पाडवा आठवून वाईट वाटतंय का असं मी (डोळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली. ते हसून म्हणालं, ‘वाईट काय वाटायचं त्यातप्रत्येक वेळचे नियम वेगळेप्रत्येक वेळच्या गमती वेगळ्या. तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय नामग आवर. मस्त पैकी चहा घे कपात ओतूनबस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्रकारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून. त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडंच आहे?’ मग ती’ गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे?
 
पांडुरंग खांडेपारकर (http://pskhandeparkar.blogspot.com/2011/03/blog-post_1008.html) हेही ज्येष्ठ नागरिक. त्यांनी गुढीपाडव्याच्या आठवणी छानच काढल्या आहेतपण अभावितपणे या सणासुदीची चिकित्साही केली आहे. अगदी लहानपणीच्याच निरागस क्षमतांनिशी.
 मराठी भाषेत लिहिणा-यांकडे वास्तवाला भिडण्याची तयारी असतेअसं हे लिखाण वाचताना वाटतं. तरुण ब्लॉगरांच्या काही नोंदींमधून तर ही तयारी अधिकच प्रकर्षानं - ड्रास्टिकली या अर्थानं- दिसते. मध्यंतरी एका कट्टर संघटनेनं गुढीपाडव्याला समर्थन आणि एकतीस डिसेंबर- एक जानेवारीच्या नववर्ष सदिच्छांनाही विरोधअसा पवित्रा घेतला होता. सुमारे 25 ब्लॉगरांनी हे आवाहन जसंच्यातसं आपापल्या ब्लॉगवर चिकटवलंते कोणत्या हेतूनंयाचे खुलासे उपलब्ध नाहीत.
‘‘आज बरंच काही खरडायची इच्छा आहे पण पेशन्स नाही. इथेच थांबतो. दारूपाटर्य़ा वाईटगुढीपाडव्यालाच नववर्ष वगरे म्हणून खट्ट असलेल्या मंडळींनाही शुभेच्छा आहेत बरं का. इथं एक सुविचार बळंच फेकावासा वाटतो. ‘‘केवळ तुम्हाला जगाबद्दल इश्शूज आहेत म्हणून जगालाही तुमच्याबद्दल इश्शूज असतीलच असं काही नाही/’’ अशी नोंद मुक्ताफळेवर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी- 2011 उजाडताना नॅकोबांनी केली आहे. (http://www.muktafale.com/post)
 
महाराष्ट्राच्या ज्या-ज्या शहरांत संगणकसाक्षरता आधी पसरलीत्या-त्या शहरांत गुढीपाडव्याच्या शोभायात्रादेखील आधी निघू लागल्याअसा एक योगायोग आहे. पण या समूह-फे-यांचं वर्णन फार कुठल्या ब्लॉगवर नाही. एकविसाव्या शतकातल्या एका ब्लॉगरनं टीव्हीवर डोंबिवलीठाणेगिरगाव इथल्या शोभायात्रा पाहून त्यांचं वर्णन ब्लॉगवर केलंय! पण मी स्कूटरवर होतेअमुक रंगाची साडी नेसले होते. माझा फोटोसुद्धा अमुक अमुक पेपरात आला’ वगैरे लिहिणारी एखादी ब्लॉगरभगिनी भेटेल इथंअशी अपेक्षा फोल ठरली. बंधूंकडून ती अपेक्षा फारशी नव्हतीच. हे झालं मुंबईचंतर अमेरिकेतल्या घरात गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या जेवणाच्या बेताचा उल्लेख एकदोघा ब्लॉगरांनी केला आहेतोही अन्य कुणी केलेला दिसला नाही.
 
हौशी लेखक नसलेल्या आणि व्यवसाय किंवा राजकीय विचाराशी संबंधितच ब्लॉगलेखन करणा-या लोकांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षभरात (म्हणजे अगदी आर्थिक वर्षात किंवा चैत्र ते फाल्गुन धरलं तरी) मराठी पत्रकारांपैकी साठ-सत्तरजण नव्यानं ब्लॉगजगतात (लिहिलं तिकडं की चिकटव इकडं- या पद्धतीनं) वावरत आहेत. कुंडली मांडणं किंवा ज्योतिष या व्यवसायात असलेले कितीजण असा व्यवसायाधारित ब्लॉग चालवतात माहीत नाहीपण क्रिकेटबिकेटवर लिहीत नसतात तेव्हा धोंडोपंत उवाच’ या नावाच्या ब्लॉगवर अनेकदा कुंडलीआकडेमोड आदींबद्दल वाचायला मिळतं. या धोंडोपंतांचे व्यवसायबंधू राजीव उपाध्ये. (http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/03/blog-post_15.htmlत्यांनी अगदी गेल्या दहाच दिवसांत केलेली एक नोंद भारी’ या सदरात मोडणारी आहे. भारतीयांच्या मुहूर्तासंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवादसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला शुभच मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्यां ज्योतिर्विंदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही. अशी सुरुवात करून उपाध्ये यांच्या ब्लॉग-नोंदीत चार एप्रिलला असणा-या ग्रह-स्थिती- बद्दल  तपशीलवार वर्णन केलं आहे.
 
सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्याचे मार्ग मोबाइलपासून ब्लॉगपर्यंत पसरलेले असतानाएका राजकीय (संभाजीभक्त) ब्लॉगरनं अनेक मराठीजन ज्या विश्वासानं गुढीपाडवा साजरा करतातत्या विश्वासांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न (छत्रपतीभक्तीतूनकेला आहे. (http://bsambhaji.blogspot.com/2011/03/blog-post.html) हा शोचनीय- म्हणजेच ज्यावर विचार करावा असा- उल्लेख मुळात असा आहे : गुढीपाडवा का साजरा करतोहा सन आपणकारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम-रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वानी आनंदाने गुढय़ा उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढय़ा उभारतो. ही माहितीही आई-वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.
 
त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.
 
राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वानी (किमान हिंदूंनी) गुढय़ा उभा करावयास पाहिजे. अयोध्येत गुढय़ा उभा करतात काअरे,अयोध्येतील लोकांना गुढय़ा म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही. िहदू धर्मात तांब्या शुभ कोणतातर सवासा-सरळ . त्यात नागवेलीचे पाने लावली आहेत. श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत. या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसाया धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा?
 
शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही! ते कसेकुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि..शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरू झाला?
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरू केला. मग आता आपण याच शकाने चैत्र शु एक ऐवजी जेष्ठ शु 13ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुद्ध 13 ला साजरे करावेया दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.
 
याहीपुढे बराच मजकूर आहे आणि तो सामाजिक अभिसरणाला बाधा आणणारामुद्दे मांडण्याच्या सुराऐवजी आरोप करण्याच्या सुरातला ठरेलहे उघड आहे. पण शिवराय-भक्त म्हणवणा-यांनी शिव-शकाला मराठी नववर्ष मानण्याऐवजी गुढीपाडव्यालाच मराठी नववर्ष’ का मानावंहा सवाल मात्र अनेकांना पेचात पाडणारा ठरेल. हा ब्लॉग काहीसा प्रचारकी असला तरी त्यातूनही वाचकाला चिंतन-मंथनाकडे जाता येऊ शकतं.
 
असोगुढीपाडव्याला बँक हॉलिडे असतो आणि तो सर्वाचा सण आहे हे ठरलेलं आहे. तेव्हा युगादीच्याचेटीचांदच्या,चैत्रप्रतिपदेपासून सुरू होणा-या नव्या शालिवाहन शकाच्या आणि गुढीपाडव्याच्याही शुभेच्छाच.. नॅकोबातुम्हालाही जाहीर शुभेच्छा!