ब्लॉगर लोक किती फास्ट असू शकतात, याचा पुरावा दोन एप्रिलरोजी पुन्हा मिळाला. इकडे ढोणीनं षटकार मारताच तिकडे‘काय वाट्टेल ते’ या महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर अक्षरं-‘जिंकलो’!!! लगेच दुस-या दिवशी सकाळपर्यंत त्यावर 12 प्रतिक्रियाही आल्या.‘‘अशा प्रसंगी प्रत्येक भारतीय, ‘मी’, ‘आम्ही’ या संज्ञा विसरून‘आपण’ होतो.’’ अशी एक प्रतिक्रिया याच ब्लॉगवर उल्हास भिडे यांनी दिली होती, ती खरीच असल्यासारखं वातावरण चार एप्रिलपर्यंत नक्कीच टिकलं होतं. रस्तोरस्ती जल्लोष- आनंद आणि तो बहर संपल्यावरही ज्याच्यात्याच्या मुखी विश्वचषक-विजयाबद्दलच्याच गप्पा! याच वातावरणात अनेकजण ब्लॉगिंगही करत होते.
दक्षिण आफ्रिकेत राहणारा मराठी क्रिकेटप्रेमी ब्लॉगर नागेश देशपांडे यानं तीन एप्रिलरोजी फोटोंसह लिहिलं.. ‘‘अश्रू, अपयश आणि परमानंद’’ या नोंदीत ‘96 च्या स्पर्धेतले विनोद कांबळीचे अश्रू’, ‘2003 मधले उपविजेतेपद’ , ‘2007मधले अपयश’ आणि ‘आज मिळालेला परमानंद.’ एवढेच शब्द आहेत! पण प्रत्येक क्षणाचे, शंभर शब्दांचं काम करणारे फोटो नागेशनं पेस्ट केले आहेत.
आपापल्या परीनं विश्लेषणही काही हौशी मराठी ब्लॉगरांनी केलं. ‘‘यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचा, जिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होते, यावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकता, विजय खेचून आणण्याची वृत्ती, लढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्त्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगले, नाही का? ’’ असं अभिजीत नावाच्या ब्लॉगरनं‘‘माझे लेखन-काही अरभाट नि काही चिल्लर!’’ या त्याच्या ब्लॉगवर लिहिलं आहे. पण पुढे अभिजीत निराळीच भूमिका घेतो : विजेत्या क्रिकेट संघात आपापल्या राज्यांतले जे खेळाडू होते,त्यांनाच बक्षिसं देण्याच्या ‘राजकारण्यांच्या वृत्ती’वर अभिजीत उखडला आहे. त्या भरात ‘‘शीला दीक्षित बाई, ही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काय? याचीच री पुढे उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब नि गुजरात सरकारने ‘आपापल्या’ खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली.’’ असे कोरडेही त्यानं ओढले आहेत. मुळात ही बक्षिसं द्यायची कशाला, हा विचार इथे नाही. लिहिणारा त्या क्षणी क्रिकेटपटूंवर खूष आहे!
अशीच खुशी अन्य काही मराठी ब्लॉगरांना होती. अविनाश वीर यांनी अंतिम सामन्यातल्या विजयानंतर अख्ख्या विश्वचषकानं क्रिकेटप्रेमींचे भावनिक प्रतिसाद कसे जागते ठेवले, याचा अथपासूनचा आलेख चितारणारा चित्रदर्शीच लेख ‘मी पण लिहितोय’ या त्यांच्या ब्लॉगवर लिहिला आहे
हे वर्णन ठाणे-घोडबंदरच्या एका बारपासून सुरू होतं.. ‘‘जिंकायचेच हे धोनी आणि संघाच्या देहबोलीतून जाणवू लागले. आणि बघता बघता धोनीने (तोपर्यंत फक्त जाहिरातीत दिसणारा) ‘हेलीकॉप्टर’ हाणला आणि आपण जिंकलो. आईशप्पथ! सगळे आनंदाने उडय़ा मारू लागले. ओळख ना पाळख सगळेच एकमेकांना (पोरी सोडून) मिठय़ा मारू लागले. मी तर वजन वाढल्यावर एवढय़ा उडय़ा मारू शकतो हे विसरूनच गेले होतो.’’ पुढे, ‘‘जल्लोष करून आम्ही आलो तलावपाळीला. फुल राडा सुरू होता. आपण जिंकलो होतो. सचिनला रडताना पाहून तर फारच भावनिक झालो’’ असं अविनाश सहज बोलल्यासारख्या आणि वाचतानाही जणू उत्साही आवाजात ऐकूच येणा-या भाषेत लिहितो. ते वाचनीय नक्कीच आहे.
हे वर्णन ठाणे-घोडबंदरच्या एका बारपासून सुरू होतं.. ‘‘जिंकायचेच हे धोनी आणि संघाच्या देहबोलीतून जाणवू लागले. आणि बघता बघता धोनीने (तोपर्यंत फक्त जाहिरातीत दिसणारा) ‘हेलीकॉप्टर’ हाणला आणि आपण जिंकलो. आईशप्पथ! सगळे आनंदाने उडय़ा मारू लागले. ओळख ना पाळख सगळेच एकमेकांना (पोरी सोडून) मिठय़ा मारू लागले. मी तर वजन वाढल्यावर एवढय़ा उडय़ा मारू शकतो हे विसरूनच गेले होतो.’’ पुढे, ‘‘जल्लोष करून आम्ही आलो तलावपाळीला. फुल राडा सुरू होता. आपण जिंकलो होतो. सचिनला रडताना पाहून तर फारच भावनिक झालो’’ असं अविनाश सहज बोलल्यासारख्या आणि वाचतानाही जणू उत्साही आवाजात ऐकूच येणा-या भाषेत लिहितो. ते वाचनीय नक्कीच आहे.
जनसामान्यांच्या आठवणीही इतिहासासाठी मोलाच्या आहेत, असं मौखिक इतिहास ही शाखा मानते. त्या आग्रहाशी तंतोतंत जुळणारा ऐवज मराठी (किंवा अन्यभाषक) ब्लॉगविश्वात आपसूक तयार होतो आहे. अविनाश वीर यांच्या लेखावर वैभव गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत पुढे एक उल्लेख आहे, ‘‘खरं सांगायचं तर दर सामन्याला मला वाटत होतं की आज काही खरं नाही आपलं. नशीब घरात देव नाहीत-नाहीतर रोजच्या बुडवण्याने पिसाळले असते माझ्यावर.’’ ही नास्तिक-अस्तिकाचा घोळ न घालणारी खिलाडूवृत्ती आज काही टक्के मराठी तरुणांच्यात भिनते आहे, असा बारकावच आहे हा. विश्वचषक जिंकल्यानंतरचा निर्व्याज आनंद, उफाळून आलेलं देशप्रेम, याचा आलेख अन्य काही मराठी ब्लॉगांवरही आहे. त्यापैकी एका ब्लॉगरनं ‘मी मॅच असली की ऑफिसलाच जातो आणि ऑफिसच्या कम्प्युटरवरून, एका मराठी वर्तमानपत्राची वेबसाइट पाहात-पाहात इतरांना स्कोअरची माहिती देतो’ हे सांगण्यात धन्यता मानली आहे. ‘क्रिकइन्फो’ सारख्या अस्सल आणि वेगवान साइटचा उल्लेखही त्यानं केलेला नाही, पण तो क्रिकेटप्रेमीच! अशी काही नमुनेदाऽर उदाहरणंही आहेत इथे.. पण ती एकदोनच. शिवाय, ‘मौखिक इतिहासा’त अशा नमुन्यांनाही स्थान असतंच की.
विश्वचषक जिंकल्यावर जे काही होतं तो युफोरिया- हर्षवायूसारखा परमानंद- असंच काही नाही, याचंही भान ब्लॉगजगतातून उलगडणारा मौखिक इतिहास आपल्याला देतो. ‘सांस्कृतिक पुणे’ या ब्लॉगवर मंगेश वाघमारेनं लिहिलेली एक पत्रवजा नोंद (हा ब्लॉग मंगेशचा नसूनही) प्रकाशित झाली आहे. मंगेश वाघमारे म्हणतात-
जरा याचाही विचार करा, असं मंगेशच्या नोंदीचं शीर्षकच आहे.. आपण निराळी भूमिका मांडतो आहोत, याची जाणीव लेखकालाही आहे. सुभाष इनामदार यांनी या नोंदीवर प्रतिक्रिया देऊन त्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं. ‘‘सध्याच्या वातावरणात असे काही बोलणे म्हणजे जणू धर्मद्रोह किंवा देशद्रोहच. जनांचा लोंढा ज्या दिशेने चालला आहे त्याविरुद्ध जाण्याचे धाडस दुर्मिळच.’’ असं इनामदार म्हणतात. पण इनामदारांना म्हणायचंय काय, हे बहुधा लक्षात न घेता, ‘धर्मद्रोह,देशद्रोह’ असे शब्द असलेली त्यांची कॉमेंट या ब्लॉगवरून सध्या गायब झालेली आहे.
आता तर इनामदारही म्हणू शकतात की, मी अशी कॉमेंट केलीच नव्हती. ब्लॉगांवरला इतिहास मौखिकच उरतो तो असा!
‘स्पृहा’ या नावानं ‘कानगोष्टी’ हा ब्लॉग लिहिणारी एकजण क्रिकेटच्या अनुभवाचं आकलन करता-करता त्याच्या पलीकडे गेली आहे. अविश्वास हा आजच्या जगातला श्वासच कसा बनलाय, या महत्त्वाच्या मुद्याला तिची ‘द ट्रमन शो’ या शीर्षकाची नोंद स्पर्श करते. हे सारं या नोंदीत क्रिकेटपासनं सुरू होतं, त्यामुळे ते वाचणं महत्त्वाचं ठरेल :
.. हे खरं की खोटं, यावर वाद घाला हवंतर.. पण त्याऐवजी जरा संवाद करण्याच्या मूडमध्ये असाल, तर स्पृहासारखा स्वत:च्या आनंदावरलाही विश्वास उडावा असा प्रसंग कधी तुमच्यावरही आलाय का, याचा खरंच विचार करा.
No comments:
Post a Comment